Tuesday, February 20, 2018

त्यां हरवण्याचा नाद आहे...

कोण जाणे कोणता तो जागल्यांचा गाव आहे
अंधकाराच्या पटाला चांदण्यांचा डाग आहे

बोलला रस्ता हसूनी पांथिकाला शोधताना 
भेटला तर हात धर, त्यां हरवण्याचा नाद आहे

वाळवंटाच्या पलिकडे पावसाचे गाव असते
रोज हा खोटे दिलासे वाटण्याचा छंद आहे

कोण मुल्ला कोण काझी कोण कुठला रामलल्ला
बांग घंटा आरत्या अन जानव्याचा वाद आहे

 विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment